धम्मपथ

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

भिमजयंती

असे करता येऊ शकेल का?

सध्या मनुवादी विरुद्ध आंबेडकरवादी हा संघर्ष गल्ली पासुन दिल्ली पर्यंत जोर पकडत आहे, मनुवाद्यांकडे पैशांची काहीच कमतरता नाही, मीडीयाची कमी नाही, आयटी सेलही मजबुत आहेत, आपन मात्र या तिनही क्षेत्रात त्यांच्यापेक्षा खुपच कमकुवत आहोत. हे सर्वांन  मान्य असावे.
मग आपन २०१९ च्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या दिसत असताना मनुवाद्यांशी राजकीय दोन हात करण्यासीठी वरील तिनही क्षेत्रात मागे पडु शकतो.
माझी अशी संकल्पना आहे की यावर्षी ची भिमजयंती ची वर्गणी *ऑर्केष्ट्रा, गायन पार्टी, नाचगाणे, मिरवणुक, डिजे, फटाके, मंडप, हाथी घोडे, डेकोरेशन, जेवन* या सर्व गोष्टीसाठी खर्च न करता तो पुर्ण पैसा संघटना मजबुत करण्यासाठी किंवा निवडणुकांसाठी, त्यावेळच्या प्रचार यंत्रणा, त्यावेळचे प्रबोधन, कैम्पेनिंग यासाठी राखुन ठेवला तर
कारण बाबासाहेबांच्या विचारांचे, संविधानाचे किंवा लोकशाहीचे संरक्षण सध्या आपल्या हौस व मौजमजेपेक्षा जास्त महत्वाचे आहे.
*आपन नाचलो नाही म्हणुन आपली अस्मिता कमी होणार नाहि मात्र आपन निवडणुकात मनुवाद्यांसमोर यावेळी जर हार खाल्ली तर मात्र अस्मिता, शान, शौक, स्वाभिमान, अधिकार या सर्वांचा राखरांगोळी निश्चित होणार*

एक दिवस नाचणार बाकी दिवस वाचणार बोलणारे " काही लोक आहेत त्यांनी सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन करावे व ठरवावे, बाबासाहेबांच्या विचारांची पेरनी करण्यासाठी तो पैसा वापरला तर बाबासाहेबांच्या आंदोलनात आपन योग्य मार्गावर जाऊ शकतो, कोणतीच क्रांती नाचुन झालेली नाही सर्वच्या सर्व क्रांत्या वाचुनच झालेल्या आहेत.

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांच्या हयातीत स्वतःच्या जन्मदिवस साजरा करायला नेहमी विरोधच केला होता.
बाबासाहेबांनीही त्यांचे गुरु तथागत बुद्धांची जयंती साजरी केली त्याचे स्वरुप कसे होते व आपन करतो त्या जयंतीचे स्वरुप कसे असते?
“मेरा जीवन ही मेरा संदेश है“ असे बाबासाहेब बोलतात, मग आपन त्यांच्या संदेशा नुसार वागलो पाहीजे, बाबासाहेबांनी जनतेच्या पैशाने कधी फेस्टिवल केले नाहीत तर त्या पैशाने संघटना मजबुत केल्या व शैक्षणिक संस्था ऊभ्या केल्या, स्वतःचा मीडीया / पाक्षिक उभे केले. आपनही त्याच मार्गाने गेले पाहीजे व बलाढ्य मनुवादी विरोधकांसमोर फक्त पैसा व यंत्रणे अभावी आपन राजनैतिक लढाई हरणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.
कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही, फक्त आपन वाट चुकलोय याची जाणीव झाली आहे ती मी जाहिर रित्या व्यक्त केली आहे.

- मनोज काळे, ठाणे
  ६ एप्रिल २०१८.